काय सांगता, बाजरीचे विक्रमी एकरी ४३ क्विंटल उत्पादन

bajari

सांगली : बाजारीचे महत्त्व आता केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील अधोरेखीत झाले आहे. महाराष्ट्रात बाजारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. मात्र सांगली जिलह्यातील एका शेतकर्‍याने एका एकरमध्ये तब्बल ४३ क्विंटल उत्पादन घेण्याचा विक्रम केला आहे. कमीत कमी रसायन खतांचा वापर, शेणखताचा वापर, नैसर्गिक रोग नियंत्रण यावर भर दिल्याने ही बाजरी विषमुक्त असल्याचे प्रयोगशाळेतील तपासणीवरून सिध्द झाले आहे. प्रयोगशाळेकडून या बाजरीला तसे प्रमाणपत्र मिळाले आहे.

बाजरीचे घटते उत्पादन लक्षात घेत शेती आणि पीक पद्धतीत बदल करत राज्याच्या कृषी विभागाने जत तालुक्यातील माडग्याळ येथे बाजरी अभियान राबवले. जत तालुक्याचा पूर्व भाग कोरडवाहू, मध्यम व हलक्या प्रतीची जमीन असलेला आहे. या भागात खरिपात प्रमुख पीक म्हणून बाजरीची पेरणी केली जाते. ३० शेतकर्‍यांचा समता शेतकरी गट स्थापन करून ‘एक गाव-एक वाण’ या अंतर्गत खरीप हंगामामध्ये २५ एकर क्षेत्रावर बाजरीची पेरणी करण्यात आली होती. पीक कापणी प्रयोगामध्ये विठ्ठल ईश्वर सावंत यांनी एक एकरात ४३ क्विंटल, विठ्ठल बाबु चोपडे यांनी ४२ तर नामदेव चनबसु माळी यांनी ४१ क्विंटल उत्पादन घेतल्याचे दिसून आले.

Exit mobile version