९ ते ११ सप्टेंबर दरम्यान या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

rain

मुंबई: गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यानुसार ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर अन्य ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल आणि किनारपट्टीवर सोसाट्याच्या वार्‍यासह झोडपधारा कोसळतील.

दरम्यान, शुक्रवारी ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी रत्नागिरीला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, नाशिक, मुंबईसह १० जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

आहे आहे पावसाचा अंदाज
९ सप्टेंंबर : रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
१० सप्टेंबर : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, लातूर, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
११ सप्टेंबर : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Exit mobile version