सेंद्रीय शेती : भारतातून कुवेतमध्ये जाणार १९२ मेट्रिक टन शेण

dung

पुणे : भारतात अलीकडच्या काही महिन्यांमध्ये सेंद्रिय शेतीवर सातत्याने चर्चा होवू लागली आहे. सेंद्रीय शेतीचे महत्व अनेक शेतकर्‍यांना पटू देखील लागले आहे. मात्र त्याचा वापर म्हणावा तसा होतांना दिसत नाही. मात्र कुवेतमध्ये सेंद्रीय शेतीचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु झाला आहे. त्यांच्या देशात सेंद्रीय खतांची टंचाई असल्याने भारतातून कुवेतमध्ये तब्बल १९२ मेट्रिक टन शेण पाठविण्यात येणार आहे. याची पहिली खेप कंटेनरमधून रवाना देखील झाली आहे. यासह अमेरिका, नेपाळ, फिलिपाइन्स आणि दक्षिण कोरिया या देशांनी देखील भारतातून सेंद्रिय खते मागवायला सुरुवात केली आहे.

सेंद्रीय शेतीत शेणाला खूप महत्व आहे. खूप पूर्वीपासून भारतात शेतखताचा वापर होत आला आहे. आता भारताचे हे गुपित संपूर्ण जगाला कळाले आहे. यामुळे अनेक देशांमध्ये सेंद्रीय शेतीकडे कल वाढतांना दिसत आहे. कुवेतच्या कृषी तज्ज्ञांच्या अभ्यासानंतर शेणखत पिकांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मानले जात आहे. यामुळे पीक उत्पादन तर वाढतेच, पण सेंद्रिय उत्पादनांच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होतो.

असे आहे शेणखताचे महत्व
शेतीमध्ये रासायनिक अन्न व कीटकनाशकांऐवजी शेणखताचा वापर केल्याने जिथे जमिनीची सुपीकता राहते, तिथे उत्पादनही जास्त होते. दुसरीकडे भाजीपाला, फळे किंवा धान्य पिकाचा दर्जाही तसाच राहतो. नांगरणी करताना जमिनीवर पडणारे शेण व मूत्र आपोआप सुपीक बनते. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की शेणात व्हिटॅमिन बी-१२ मुबलक प्रमाणात आढळते. ते किरणोत्सर्गीता देखील शोषून घेते.

शेण हे पिकांसाठी अत्यंत उपयुक्त कीटकनाशक असल्याचे सिद्ध झाले आहे. शेण आणि गोमूत्र यांचा कीटकनाशके म्हणून वापर करण्यासाठी संशोधन केंद्रे उघडली जाऊ शकतात, कारण रासायनिक खतांच्या दुष्परिणामांशिवाय कृषी उत्पादनात वाढ करण्याची यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. यातील जीवाणू इतर अनेक गुंतागुंतीच्या आजारांवरही फायदेशीर आहेत.

Exit mobile version