Krushi Din Maharashtra : महाराष्ट्रात १ जुलैला कृषी दिन का साजरा केला जातो, माहित आहे का?

maharashtra-krushi-din-1-july

Maharashtra Krushi Din 1 July : महाराष्ट्रात दरवर्षी १ जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिवस साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त साजरा केला जातो. वसंतराव नाईक यांना महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनकही म्हटले जाते. त्यांनी कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि राज्यातील शेतकर्‍यांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा करून त्यांच्या कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाचे स्मरण केले जाते.

देशाची तसेच राज्याची अर्थव्यवस्था मुख्यत: कृषी क्षेत्रावरच अवलंबून आहे. महाराष्ट्र राज्यही कृषी क्षेत्रात एक अग्रगण्य राज्य समजलं जातं. अनेक उत्पादनांसाठी देशभरातील अनेक राज्ये महाराष्ट्रावर अवलंबून असतात. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचे मोठे योगदान आहे. वसंतराव नाईकांच्या काळात राज्यात कृषी विद्यापीठं आणि कृषीशी संबंधित विविध संस्थांची निर्मिती झाली. राज्यात १९७२ साली ज्यावेळी दुष्काळाचं संकट आलं होतं त्यावेळी त्यांनी अनेक उपाययोजना राबवल्या. त्यांनी शेतकर्‍यांना संकरीत बियाणं उपलब्ध करून दिली, जलसंधारणाची कामं वाढवली आणि शेतीला शाश्‍वत विकासाचा मार्ग दाखवला.

त्यांच्या सन्मानार्थ दरवर्षी १ जुलैला राज्यात कृषी दिवस साजरा करण्यात येत असून १ जुलै ते ७ जुलै या आठवड्याभराच्या काळात कृषी सप्ताह साजरा केला जातो. हा दिवस महत्त्वाचा आहे कारण हा दिवस राज्यातील शेतकर्‍यांना आणि कृषी क्षेत्राशी संबंधित समस्यांवर बोलण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो.

Exit mobile version