‘ई-पीक पाहणी’बाबत मोठा निर्णय, प्रत्येक शेतकर्‍यासाठी महत्वाची बातमी

e pik app

पुणे : पावसाने पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता पीकविमा योजनेसंदर्भात शेतकर्‍यांच्या हिताच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्वचा निर्णय घेतला आहे. विमा हप्ता भरताना आता ई-पीक पाहणीची नोंद ही अट रद्द करण्यात आली आहे. गतवर्षी पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठीची प्रक्रिया करीत असतानाच शेतकर्‍यांना आपण ई-पीक पाहणी केली असल्याचा अहवाल सादर करावा लागत होता. पण तशी गरज भासणार नाही. तर पीक पाहणीमध्ये केलेली पिकांची नोंद हीच अंतिम गृहीत धरली जाणार आहे. गतवर्षी याच अटीमुळे अनेक शेतकरी हे मदतीपासून वंचित राहिले होते.

पीकविमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ही ३१ जुलै आहे. आतापर्यंतच्या निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा शेतकर्‍यांचा सहभाग वाढेल असा अंदाज आहे. पेरण्या लाबल्याने आतापर्यंत केवळ १३ लाख शेतकर्‍यांनी योजनेत सहभाग नोंदवला असला तरी ही संख्या वाढेल असा आशावाद कृषी विभागाला आहे.

शासनाने विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पीक पाहणी अनिवार्य ही अटच दूर केली आहे. विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ही ३१ जुलै आहे तर १ ऑगस्टपासून पीक पेर्‍याची नोंदी घेण्याचे काम सुरु होणार आहे. त्यामुळे पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पीक पाहणीची नोंद सक्तीची असल्याबाबत संभ्रम कायम होता. मात्र, प्रत्यक्ष सहभाग घेतानाचे पीक आणि पाहणीच्या वेळीचे पीक यामध्ये तफावत असल्याचे मत कृषी विभागाने वर्तवले.

Exit mobile version