‘ई-पीक पाहणी’, शेतकरी अन् कृषी विभागाचे काम हलके होणार

e pik app

सोलापूर : ‘ई-पीक पाहणी’कडे दुर्लक्ष केले जात असल्याची ओरड नेहमीच केली जाते. याचे खापर शेतकर्‍यांवरच फोडले जाते. मात्र महसूल आणि कृषी विभागाच्या अंतर्गत मतभेदांमुळे ‘ई-पीक पाहणी’ सारख्या उपक्रमाला अद्यापही मूर्त स्वरुप मिळालेले नाही. हे आता सरकारच्याही लक्षात आले आहे. या करिता ई-पीक पाहणीसाठी राज्यातील चारही कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. या निर्णयामुळे शेतकरी अन् कृषी विभागाचे काम हलके होणार आहे.

ई-पीक पाहणीच्या माध्यमातून पिकांची नोंद तर होतेच पण नुकसानभरपाई दरम्यान या पाहणीच्या आधारे शेतकर्‍यांना मदतही मिळते. मात्र याची अंमलबजावणी योग्य पध्दतीने होत नाही. शिवाय स्मार्ट फोनचा वापर करुन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे शेतकर्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी हे मदतीपासून वंचित राहिले असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर उपाय म्हणून आता ई-पीक पाहणीसाठी कृषी महाविद्यालयांची मदत घेण्यात येणार आहे.

या नव्या धोरणामुळे शेतकर्‍यांच्या पिकांची अचूक नोंद तर होणार आहेच पण शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन विविध विषयाचा अभ्यास करणेही विद्यार्थ्यांना शक्य होणार आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांची याकरिता नोंदणी सुरु करण्यात आल्याचे ई-पीक पाहणीचे राज्य समन्वयक श्रीरंग तांबे यांनी सांगितले आहे. यासाठी कृषी महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना यासंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे.

‘ई-पीक पाहणी’चे असे आहेत फायदे
१) ‘ई-पीक पाहणी’ या अ‍ॅपरील नोंदीमुळे राज्यात, देशात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे याची अचूक आकडेवारी एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहे.
२) पिकाच्या अचूक आकडेवारीमुळे उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येतो. यावरुन भविष्यात बी-बियाणे लागणारे खत हे पण उपलब्ध करुन देता येणार आहे.
३) शेतावरील गटावर झालेल्या पीक नोंदीचा फायदा हा देशात कीती क्षेत्रावर कीती ऊत्पन्न झाले हे सांगण्यासाठी देखील होणार आहे.
४) पिकाच्या छायाचित्रामुळे किती अक्षांश: आणि किती रेखाअंशावर कोणत्या पिकाचा पेरा झाला आहे हे समजले जाणार आहे.

Exit mobile version