नागपूर : मागीलवर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतमालाची आवक सुरू असताना शेतकऱ्यांना कमी दर मिळत होता, मात्र, आता शेतकरीही अंतिम टप्प्यात असले तरी, त्यांच्या हाती निराशाच आली आहे. गेल्या वर्षी खरीप सोयाबीन, कापूस आणि इतर उत्पादनांच्या किमती वाढण्याची अपेक्षा असतांना, केवळ कापसाचे भाव वाढल्याचे दिसून आले. दरम्यान, संपूर्ण हंगामात सोयाबीनचे भाव नियंत्रित होते. उत्पादनात घट झाल्याने तरी, भाव वाढतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती परंतु, शेतकऱयांची ही आशाही खोटी ठरली. हंगामाच्या शेवटपर्यंत पिकाला हवे तसे भाव मिळाले नाहीत. यंदा 14 हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विकला गेला असून, कापूस उत्पादनात घट झाल्याने शेवटच्या टप्प्यात शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला, पण इतर उत्पादनांच्या बाबत तसे झाले नाही.
गतवर्षी कमी वाढीमुळे खरीप पिकाच्या दरापेक्षा जास्त पावसामुळे नुकसान झाले होते. पावसामुळे फक्त उत्पादनातच घट झाली नाही, तर कृषी उत्पादनांच्या गुणवत्तेवरही मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यानंतर कापसाचे भाव 6,000 रुपयांनी आणि सोयाबीनचे भाव 4,700 रुपयांनी खाली आले. मात्र शेतकऱ्यांनी शेतीमाल विकण्याऐवजी साठवणूक करण्याला पसंती दिली. दिवाळीनंतर सोयाबीन आणि कापसाचे भावात मोठी वाढ झाल्याचे पाहण्यास मिळाले. आता हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात सोयाबीन 6,700 रुपये प्रतिक्विंटल तर, कापसालाही विक्रमी भाव मिळत आहे.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन, तूर आणि हरभरा हे प्रमुख उत्पादन असून, नाफेडने हरभरा आणि तूर खरेदी केंद्र सुरू केले होते, मात्र यंदा हमीभाव केंद्र आणि खुल्या बाजारभावात फारसा फरक दिसला नाही. हमीभाव केंद्रावर तूर 6 हजार 300 रुपये प्रति क्विंटल तर खुल्या बाजारात 6 हजार रुपये प्रति क्विंटल विकली जात आहे. हरभऱ्याच्या भावात मोठी तफावत दिसून आली. खरेदी केंद्रावर 5,300 रुपये प्रतिक्विंटल होती, तर खुल्या बाजारात ती केवळ 4,600 रुपयांपर्यंत आहे. यावरून कापसाव्यतिरिक्त इतर उत्पादनाने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयावर शेतमालाचे भाव अवलंबून असल्याने, यंदा सोयाबीनच्या दरात बराच बदल जानवला. मात्र भावात अपेक्षेप्रमाणे वाढ झाली नसल्याने, शेतकरी निराश झाले. शेतकऱ्यांनी सोयाबीनची शेवटपर्यंत साठवणूक केली असून, आता सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. दरम्यान, आता शेतकऱयांनी निकृष्ट आणि सामान्य सोयाबीनला सारखाच भाव मिळावा अशी मागणी केली आहे.