शेतकऱ्यांचा ठाकरे सरकारला सात दिवसांचा अल्टिमेटम; या आहेत ११ मागण्या

uddhav-thackeray

पुणतांबा : राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे किसान क्रांतीच्या झेंड्याखाली आंदोलनाला दिशा देण्यासाठी आज विशेष शेतकरी ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत गावातील शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ११ ठराव संमत करण्यात आले. शेतकर्‍यांनी ठाकरे सरकारला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला असून १ जून पासून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

सर्व ठराव रीतसर तयार झाल्या नंतर या ठरावाच्या प्रती देऊन सात दिवसाची वाट पाहून जर सरकारने नमते धोरण घेत निर्णय घेतला तर आंदोलन करणार नाही. पण सरकारने जर काही पाऊल उचलले नाही तर एक जून ते सात जून पर्यंत धरणे आंदोलन धरणे आंदोलन होईल. जर सरकारने पाच जून पर्यंत काही प्रतिसाद दिला नाही तर आंदोलनाची दिशा वेगळी असणार असं सर्वानुमते ठरले.

हे देखील वाचा : शेती व शेतकऱ्यांची नवी पिढी तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची ‘ही’ आहे योजना

शेतकर्‍यांनी आपल्या व्यथा मांडताना २०१७ मध्ये झालेले आंदोलन हे मध्येच अर्ध्यावर सोडून आंदोलन संपले असे सांगितल्या नंतर शेतकर्‍यांनी आंदोलन न संपवत पुढे सुरू ठेवून आंदोलन यशस्वी केले. तसे करायचे असेल तर आंदोलन करून शेतकर्‍यांना फसवू नका. राजकीय पक्ष, नेत्यांपासून अलिप्त राहून आंदोलन लवकरात सुरू करावे, असे मतही व्यक्त केले.

या आहेत मागण्या.
१) ऊसासाठी प्रती टन १००० सरकारने अनुदान द्यावे. गाळप न झालेल्या उसाला २००००० रुपये हेक्टरी मिळावे
२) सर्व शेतीमालाला एफ आर पी ठरवून कांद्याला ५०० रुपये अनुदान मिळाले पाहिजे
३) दिवसा वीज बारा तास मिळाली पाहिजे
४) संपूर्ण वीज बिल माफ करण्यात यावे
५) कांद्याची, गहू ची निर्यात बंद करण्यात येऊ नये
६) सर्व पिकासाठी एक एस पी ला कायदा करून किमान किंमत ठरवावी.
७)अनुदान तसेच कर्जमाफी करिता कोणत्याही अटी शर्ती ठेऊ नये.
८)दुधाचा एफआरपी निश्चित करण्यात येऊन सरकारने तडजोड करून किमान किंमत लिटर ला ४० रुपये दर करावा
९)पेरणी ते कापणी पर्यंत महाराष्ट्र रोजगार हमी मार्फत कामे करण्यात यावे
१०)वन्य जीव प्राण्यापासून होणार्‍या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी,
११) २०१७ रोजी झालेल्या आंदोलक शेतकर्‍या वर झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे.

Exit mobile version