३ बीघे शेतीतून तब्बल २ कोटींचे उत्पादन; जाणून घ्या कसे?

indian currency

पुणे : सेंद्रिय खतांचे महत्त्व आता सर्वांनाच पटू लागल्याने शेतकरीही आता रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करु लागले आहेत. एका शेतकर्‍याने तर सेंद्रिय खत तयार करण्यासाठी चक्क १६ गायी पाळल्या आहे. त्या गायींच्या दूध, शेण, लघवी, दही, ताक व तूपापासून खत तयार करत त्याचा वापर आपल्या शेतीत केला. यामुळे जमीनीची सुपिकता कमालीचा वाढली. याचा परिणाम म्हणजे, त्या शेतकर्‍याचे उत्पन्न दुप्पट झाले असून केवल ३ बीघे शेतीत त्या प्रगतिशील शेतकर्‍याने तब्बल २ कोटींचे उत्पादन घेवून दाखविले आहे.

राजस्थान मधील अलवार शहराजवळील गुजुकी गावातील शेतकरी जितेंद्र कुमार सैनी (४०) यांच्या शेतात गाईच्या दुधाने शेतात पाणी देतात. वाचायला थोडेसे आश्‍चर्य वाटेल मात्र ही स्टोरी खरोखरच प्रेरणादायी आहे. २०१२ मध्ये जितेंद्रने ३ बिघा शेतात पॉली हाऊस उभारले. जितेंद्र यांनी सांगितले की, २०१० मध्ये कृषी विभागाच्या वतीने परिसरातील शेतकर्‍यांची एक टीम भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली येथे गेली होती. जितेंद्रही या टीमचा एक भाग होता. तेथे त्यांना पॉली हाऊस शेतीबाबत सांगण्यात आले. नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली. त्या तंत्राचा वापर जितेंद्र यांनी स्वत:च्या शेतात केला.

जितेंद्र द्रव औषध म्हणून कीटकनाशक वापरणे टाळतात. त्याऐवजी त्यांनी गाईचे दूध आणि हळद यापासून आरोग्यदायी फवारणी तयार केली असून त्यामुळे पिकाला किडे येत नाहीत. खत म्हणून शेणाचा वापर केल्याने उत्पादन आणि जमिनीची सुपीकता वाढली, म्हणून २०१५ मध्ये जितेंद्र यांनी गीर जातीच्या गायी खरेदी केल्या. त्यांच्या शेणाची मळी बनवून शेतात टाकायला सुरुवात केली. गाईचे दूध, गोमूत्र, शेण, दही, ताक आणि तूप हे सर्व जितेंद्र खत आणि फवारणीसाठी वापरत आहेत. जितेंद्र सांगतात की, आम्ही सेंद्रिय शेती करतो. रसायने अजिबात वापरत नाहीत. मोठी गोष्ट म्हणजे त्यामुळे उत्पन्न वाढले, खर्च कमी झाला आणि उत्पन्न वाढले.

आता जितेंद्र गाईच्या शेणात दूध, ताक, तूप याशिवाय हळद, गूळ आणि माती मिसळतो. त्याचे परिणाम म्हणजे, मालाचे उत्पादन ७० टनांवरून ११० टन झाले आहे. जितेंद्र सांगतात की ते रासायनिक औषधे आणि युरियावर वर्षाला २ ते ३ लाख रुपये खर्च करायचे. आता हा खर्च शून्य झाला आहे. पॉली हाऊसमधील ३ बिघा शेतात ते वर्षाला ३५ लाख रुपयांचा भाजीपाला विकतात. ज्याचा खर्त सुमारे १० लाख आहे. वर्षाला २५ लाखांची बचत होते.

जितेंद्र यांनी सांगितले की, सध्या त्यांच्या १६ गायींपैकी १० गायी शेण आणि गोमूत्र खत म्हणून उत्पादनात वापरत आहेत. ६ गायींचे दूध, ताक आणि तूप पूर्णपणे शेतीसाठी वापरले जाते. जितेंद्रने २०१२ पासून आतापर्यंत १० वर्षात पॉली हाऊसमधून ३ कोटींची शेती केली आहे. २०१२ ते २०१६ या पहिल्या ५ वर्षात १ कोटी रुपयांची उलाढाल झाली. त्यानंतर २०१७ नंतर २ कोटी रुपयांपर्यंतचा व्यवसाय केला आहे.

Exit mobile version