शेतीमध्ये निसर्गाचे महत्त्व असते, पण कसे? वाचा सविस्तर

farmer 1

औरंगाबाद : आधुनिक शेती करतांना ट्रॅक्टरसह अन्य यंत्राचा वापर केला जातो. कमी कालावधीत जास्त उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खते व कीटकनाशकांचा अति वापर होतो. या शेती पद्धतींमुळे कमी वेळेत बंपर उत्पन्न देऊन शेतकर्‍याला अधिक उत्पन्न मिळत आहे, पण त्याचे परिणामही त्याच वेगाने होत आहेत. आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब केल्यामुळे शेतीच्या सुपीकतेसोबतच पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत.

नैसर्गिक शेती व्यवस्थेत प्राण्यांना महत्त्वाचे स्थान आहे. बैलांच्या मदतीने केली जाणारी नांगरणी शेताच्या आरोग्यासाठी चांगली मानली जाते. प्राणी धूर सोडत नाहीत, पेट्रोल-डिझेल पीत नाहीत, अशा परिस्थितीत ते पर्यावरण संतुलन राखण्यासाठीही उपयुक्त ठरतात. शिवाय त्यांच्या शेणामुळे शेताची सुपीक शक्ती वाढते. याशिवाय शेतात गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्यांचा वावर हा जमीनीला पोषक घटक देवून जातो.

मातीच्या सुपीकतेमध्ये मुंग्या, गांडूळ व्यतिरिक्त नवीन दृश्य-अदृश्य सूक्ष्मजीवांची गरज आणि महत्त्व जाणून आता बहुतांश शेतकरी सेंद्रिय खताचा अवलंब करत आहेत. मुंग्या आणि गांडुळे शेतीच्या आरोग्यासाठी खूप मदत करतात. त्यांच्या मदतीने, जमिनीची नाजूकता राखली जाते, तसेच ते कीड संरक्षण व्यवस्थापनात शेतकर्‍यांना नैसर्गिकरित्या मदत करतात.

नैसर्गिक शेती पद्धतीला आधुनिक पद्धतीची जोड दिल्यास शेतकरी कमी खर्चात शेती हा फायदेशीर व्यवसाय बनवू शकतात. उदाहरणार्थ, शेतजमीन, धान्याची वाहतूक इत्यादी शेतीच्या कामात ट्रॅक्टर इत्यादींची मदत घेता येते. बेड आणि ठिबक सिंचन पद्धतीमध्ये आधुनिक पद्धती वापरून ते अधिक फायदेशीर बनवता येते. रासायनिक खतांऐवजी गायी, मेंढ्या, शेळ्या यांचे संगोपन करून शेतातच सेंद्रिय खताची निर्मिती करून नैसर्गिक चक्र टिकवून ठेवता येते.

Exit mobile version