पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा शेतकऱ्यांना खास सल्ला

नाशिक : शेतकऱ्यांनी जमिनीचे आरोग्य जपले पाहिजे.विषारी अन्न निर्माण करु नये. ताटात चांगले अन्न आले तर पुढची पिढी चांगली घडेल त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे प्रतिपादन बीजमाता कृषीकन्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले.

जय किसान फार्मर्स फोरम व ‘आमची माती आमची माणसं’ तर्फे भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त नाशिकच्या सायखेडकर नाट्यगृहात “कृषिरत्न” प्रेरणा पुरस्काराने राज्यातील ४० शेतकऱ्यांना सपत्निक सन्मानित करण्यात आले, त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.

कृषिरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याला माजी खा. ब्रिगेडियर सुधीर सावंत,इफकोच्या संचालिका साधना जाधव, माजी कृषी आयुक्त पांडुरंग वाठारकर, कृषिभूषण सदुभाऊ शेळके,लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, ज्येष्ठ उद्योजक पांडुरंग चव्हाण,कृषी अ़ग्रोटेकचे सुभाषराव शिंदे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जय किसान फार्मर्स फोरमचे अध्यक्ष प्रा.डॉ. संजय जाधव यांनी प्रास्तविक केले. यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले की, डॉ. पंजाबराव देशमुखांचे कृषी क्षेत्रातील योगदान फार मोठे आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळून विषमुक्त अन्नधान्य निर्माण करावे असे सांगितले. साधना जाधव यांनी खते देण्यापूर्वी जमिनीची तपासणी करुन आवश्यक ते घटक दिले गेले पाहिजे असे सांगितले.

राज्यातील 40 शेतकऱ्यांना मेडल, ट्रॉफी, फेटा,पैठणी साडी,सन्मानपत्र,आणिडॉ. पंजाबराव देशमुख गौरव विशेषांक देवून गौरविण्यात आले.कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित केलेल्या शेतकऱ्यांमध्ये अर्जुन मोतीराम तोरवणे(धुळे), माधव सावळीराम खैरे (हरसूल,नाशिक), बाळासाहेब यशवंत घोरपडे (सातारा), गोरख मुरलीधर पाटील (कळवण,नाशिक), ज्ञानदेव सोनबा कोरडे (सिंगापुर,पुणे), ज्ञानेश्वर पंडितराव पवार (साक्री, धुळे), निखिल विलास शिंदे (देवरगाव,नाशिक), नितीन चंद्रकांत झगडे(बारामती,पुणे), सुवर्णा ज्ञानेश्वर जगताप (लासलगाव), शिवराज रविंद्र मेटकर (अमरावती), नामदेव कुशाबा शिंदे (वनसगाव,नाशिक), रामदास सौदागर खराडे(माढा,सोलापूर), संजय चंद्रभान गावंडे(बुलडाणा), भिकन लक्ष्मण देवरे (ओतूर,नाशिक), दिनेश काशिराम दळवी (रत्नागिरी), धनंजय सिताराम बोरसे (कळवण,नाशिक), ऋषिराज मोहनराव पाटील (पाटण,सातारा), दुल्लभ दयाराम जाधव (जैताणे,धुळे), जगन्नाथ दावल माळी (देवळा,नाशिक), शशिकांत कांतीलाल तोरडमल(अहमदनगर), ज्ञानेश्वर नामदेव सणस (पुणे), शांताराम वाळू कमानकर(निफाड,नाशिक), स्वप्निल प्रल्हाद सुर्यवंशी(कराड), रविंद्र वसंतराव वाबळे(उगाव,नाशिक), अशोक भाऊसाहेब देशमुख (संगमनेर), तानाजी दादाजी देवरे(बागलाण,नाशिक), डॉ. नितीन आप्पासाहेब बाबर (सोलापूर), आण्णासाहेब मारुती गांगुर्डे(तीसगांव,चांदवड), दिनेश राजेंद्र सोळूंके(मालेगांव), दादाजी रेवबा जाधव (कळवण, नाशिक), एकनाथ नाना केदारे (निफाड), संदीप माधवराव उफाडे (नाशिक), निमसे पाटील अ़ॅग्रो (श्रीरामपूर), श्रीमंत समृद्धी अ़ॅग्रो प्रोड्यूसर कंपनी लि. (वैजापूर), उत्कर्ष अ़ॅग्रो प्लस इको फार्म प्रा. लि. (जत, सांगली), लोहकणे पाटील अ़ॅग्रो प्रोड्यूसर कं.लि.( डोणगाव,औरंगाबाद), शामराव सुरेश पगार (दिंडोरी,नाशिक), स्वप्निल रकिबे (धोडांबे,नाशिक), महेश माधव वाघ (जोपूळ,चांदवड), डॉ.सुनिल मोरे (चांदवड,नाशिक) यांचा समावेश आहे.

यावेळी डॉ.पंजाबरांवांचे कार्य यावर चर्चा सत्र झाले. आमची माती आमची माणसं मासिकाच्या “शेतकरी गौरव” विशेषांकाचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. गायिका रेखा महाजन व सुखदा महाजन तसेच तुषार वाघुळदे यांचा शेतकरी गीते आणि शेतकऱ्यांची आजची स्थिती यावर सांस्कृतिक कार्यक्रम व भाष्य सादर करण्यात आले.पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या हस्ते जळगावचे पर्यावरण मित्र व कलावंत तुषार वाघुळदे , रेखा महाजन व गायिका सुखदा महाजन यांचा विशेष गौरव करण्यात आला.

Exit mobile version