अतिरिक्त ऊस गाळप प्रश्‍न सोडविण्यासाठी साखर आयुक्तांनी शोधला रामबाण उपाय

sugar factori

प्रतीकात्मक फोटो

पुणे : गतवर्षी अतिरिक्त ऊस गाळपाचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. साखरेचे मोठ्याप्रमाणात उत्पादन घेवूनही ऊस शिल्लक राहिला होता. यंदाच्या हंगाामात अशी वेळ पुन्हा येवू नये यासाठी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्य सरकारकडे एक प्रस्ताव पाठविला आहे. यात त्यांनी ऊस गाळप हंगामाच्या वेळापत्रकातच बदल करावा अशी शिफारस केली आहे. याबाबत राज्य सरकार आता काय निर्णय घेते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

गतवर्षी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम होता. त्यामुळे जूनपर्यंत या विभागातील साखर कारखाने हे सुरुच होते. जालना, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ऊस अखेर शिल्लक राहिलाच होता. ऊसाचे क्षेत्र वाढल्याने ही समस्या निर्माण झाली होती. शेतकर्‍यांचा ऊस शिल्लक राहू नये आणि ऐनवेळी ऊसतोड कामगारांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदाचा हंगाम १५ दिवस आगोदर सुरु करण्याची शिफारस साखर आयुक्तांनी केली आहे.

दरवर्षी साधारणत: १५ ऑक्टोबर नंतर साखर कारखान्यांची धुराडी ही पेटते. यंदा मात्र, १ ऑक्टोबरपासून हंगाम सुरु केला तर अतिरिक्त ऊसाचे गाळप रखडणार नाही असे साखर आयुक्तांचे म्हणणे आहे. ऊस गाळप होण्यापूर्वी शेतकर्‍यांना आपल्या उसाची नोंद ही जवळच्या साखर कारखान्यावर करावी लागते. त्याकरिता आता साखर आयुक्त कार्यालयाकडून मोबाईल अ‍ॅप विकसीत केले जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना अगदी सहज नोंदणी तर करता येईलच पण ऊस तोडीची तारिख आणि सर्वकाही माहिती हे मोबाईलवरच मिळणार आहे.

Exit mobile version