तुर्कस्तानने भारताचा हजारो टन गहू परत पाठविला; हे आहे कारण

wheat

नवी दिल्ली : भारतीय गहू खराब असल्याचे कारण सांगत तुर्कस्तानने तब्बल ५६,८७७ टन भारतीय गहू परत पाठविला आहे. भारतातून आलेल्या गव्हामध्ये रुबेला विषाणू आढळून आल्याचे कारण देत तुर्कस्तानने भारतीय गहू नाकारला आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे भारतीय गव्हाची मागणी वाढली आहे. यामुळे भारताला निर्यातीवर बंदी घालावी लागली. असे असतांना भारतीय गव्हात रुबेला विषाणू असल्याचे आरोप केल्यामुळे भारतीय व्यापारी चिंतेत आले आहे. याचा आंतरराष्ट्रीय मागणीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे देशात आणि परदेशात गव्हाच्या किमती खाली येऊ शकतात.

रुबेला विषाणू किंवा जर्मन गोवर हा विषाणूजन्य संसर्गजन्य रोग आहे. हे बर्‍याचदा शरीरावर विशिष्ट लाल पुरळ दर्शवते. यामुळे संसर्गजन्य रुग्णांमध्ये कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसून येत नाहीत. रुबेला विषाणूचा संसर्ग ३-५ दिवस टिकू शकतो आणि जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकते, शिंकते किंवा नाक आणि घशातून स्राव येतो तेव्हा त्याचा प्रसार होऊ शकतो.

भारतातून आलेल्या गव्हामध्ये रुबेला विषाणू आढळून आला होता. त्यामुळे तुर्कस्तानच्या कृषी आणि वन मंत्रालयाने त्याचा वापर करण्यास परवानगी दिली नाही, असे तुर्कस्तानच्या अधिकार्‍यांनी सांगितले. तुर्कस्तानने भारतीय गव्हाची खेप नाकारली आणि ती परत पाठवली. ही जहाजे तुर्कस्तानहून गुजरातमधील कंडाळा बंदरात परत येत आहेत.

Exit mobile version