टरबूजाचे भाव पडले.. बाजारात विकण्याऐवजी शेतकरी चारत आहेत जनावरांना

Watermelon

नाशिक : महाराष्ट्रातील टरबुज उत्पादक शेतकरी बाजारात योग्य भाव न मिळाल्याने अडचणीत सापडला असून त्यांना आपला माल फेकून द्यावा लागला आहे. राज्यात एकीकडे कांदा उत्पादक शेतकरी कमी भावाने निराश झालेला असल्याने, त्यांनी २०० क्विंटल कांदा लोकांना मोफत वाटल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्याचबरोबर आता टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचीही परिस्थिती जैसे थे आहे. हंगामाच्या सुरुवातीला टरबूज 15 ते 17 रुपये किलो होता, मात्र आता दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. 4 टरबूज 10 रुपयांना विकले जात असल्याची परिस्थिती आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर टरबूजाचे दर किलोमागे तीन ते सहा रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

एवढी घसरण पाहून उत्पादक चिंतेत पडले आहेत. शेतकऱ्यानी आपल्या एक दीड एकर जमिनीत टरबूजाची लागवड केली होती, त्यामुळे त्यांना चांगले उत्पादन मिळाले. टरबुजाचा दर चांगला मिळत असेल तर त्याचाही फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होत्या.  पण, त्यांच्या सर्व आशा धुळीला मिळाल्या. सुरुवातीला टरबूजाला विक्रमी भाव मिळत असे, मात्र आता तसे नाही. यामुळेच शेतकरी आता टरबूज बाजारात विकायला घेऊन जाणेही परवडत नसल्याने, शेतकरी जनावरांना चारा म्हणून टाकत आहेत.

चार टरबूज 10 रुपयांना विकले जात आहेत

यंदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मुख्य पिके वगळता हंगामी पिकांचा आग्रह धरला होता, त्यामुळे त्यांना चांगला भाव मिळत होता. विक्रमी दर पाहून शेतकऱ्यांनी पीकपद्धतीतही बदल केला, मात्र हा विक्रमी दर फार काळ टिकू शकला नाही आणि भाव कमालीचे खाली आले. बाजारात आंब्याची मागणी वाढल्याने टरबूजाची मागणी घटल्याचे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. पूर्वी 15 रुपये किलो असलेला टरबूजाचा दर आता 10 रुपयांना 4 विकले जात आहे. त्यामुळेच आता शेतकऱ्यांना त्यांची फळे फेकून द्यावी लागत आहेत किंवा जनावरांना खायला द्यावे लागत आहेत, कारण इतक्या कमी किमतीतही ते त्यांचा खर्च भागवू शकणार नाहीत.

उत्पादन चांगले पण भाव कमी 

यंदा शेतकऱयांना टरबुजाचे चांगले उत्पादनही मिळाले, मात्र बाजारात विक्रीची वेळ आल्याने दर कमी झाले. आता 4 टरबूज 10 रुपयांना विकले जात आहेत. या लागवडीसाठी 80 हजार ते 1 लाख रुपये खर्च आला आहे. अशा परिस्थितीत एवढी कमी किंमत मिळाल्याने  शेतकऱयांना कोणताही फायदा होणार नाही. शेतकऱयांचा खर्चही निघणार नाही आणि वाहतुकीचा खर्चही निघणार नाही. ते शेतातून बाजारात नेण्यासाठी तीन हजारांपर्यंत खर्च येतो. म्हणूनच उत्पादक शेतकरी टरबूज विकण्यापेक्षा जनावरांना विकणे चांगले वाटत आहे. मुख्य पिकांबरोबरच हंगामी पिकांनीही शेतकऱ्यांची निराशा केली आहे. टरबूजाच्या मागणीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे वाहतुकीवर खर्च करून बाजारपेठेत पोहोचणेही शेतकऱ्यांना अवघड झाले आहे.

Exit mobile version