नंदुरबार जिल्ह्यातील ५७ हजार शेतकरी पीएम किसान निधीपासून वंचित राहणार? हे आहे प्रमुख कारण

farmer-in-tension

नंदुरबार : पीएम किसान सन्मान निधी योजनेचे ११वा हप्ता वितरित झाला असून शेतकर्‍यांना लवकरच १२वा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. हा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना ई-केवायसी बंधनकारक आहे. पीएम किसान योजनेंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २४ हजार लाभार्थीची नोंदणी करण्यात आली आहे. मात्र यापैकी केवळ ६७ हजार शेतकर्‍यांनीच ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. यामुळे जिल्ह्यातील ५७ हजार शेतकरी पीएम किसान निधीपासून वंचित राहणार का? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. PM Kisan Nandurbar District

ई-केवायसीसाठी शेतकर्‍यांना ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ती ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतरही तांत्रिक अडचणींमुळे ही मुदत आता ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आता ३१ जुलैपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावीच लागणार आहे. यानंतरच आता १२ वा हप्ता मिळणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांची ई-केवायसीची प्रक्रिया अद्यापही पूर्ण करण्यात आलेली नाही. जर शेतकर्‍यांना १२ व्या हफ्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वांनी तातडीने ई-केवासीची प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.
हे देखील वाचा: ‘ई-केवायसी’ची मुदत पुन्हा वाढवली, आता या तारखेपर्यंत करा प्रक्रिया पूर्ण

अशी पूर्ण करा ई-केवायसीची प्रक्रिया
eKYC करण्यासाठी www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर गेल्यावर ‘Former Coerner’ वरील eKYC ला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आधार केवायसी नावाचे एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये सुरुवातीला आधार कार्ड क्रमांक त्यानंतर समोरच्या बॉक्समधील अक्षरे आणि अंक आहेत तसे टाकावेत. त्यानंतर search या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये सुरुवातीला आधार नंबर दिसेल त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे तोच येथे टाकावा. त्यानंतर Get Otp यावर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर OTP नंबर येईल तो OTP येथे submit करावा. त्यानंतर submit for Auth यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर EKYC is successful submitted असा एसएमएस दिसेल. याचाच अर्थ eKYC submitted यशस्वी झाला आहे. यादरम्यान invalid असा पर्याय समोर येत असेल तर काही दिवसांनी eKYC करायचे किंवा CSC केंद्रावर जाऊन कागदपत्रे जमा करून eKYC करून घ्यावे लागणार आहे.

Exit mobile version