खरिपात सोयाबीन बियाणे मुबलक उपलब्ध होणार, हे आहे प्रमुख कारण

soyabean rate

नागपूर : दरवर्षी खरिप हंगामात सोयाबीन बियाणे टंचाई ही ठरलेलीच आहे. यंदा मात्र ही टंचाई भासणार नाही. यंदाच्या उन्हाळी हंगामात बिजोत्पादन घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल हा वाढलेला आहे तर दुसरीकडे महाबीजनेही राज्यात तब्बल १२ हजार हेक्टर क्षेत्रफळावर बिजोत्पादनाचा कार्यक्रम घेतला आहे. त्यामुळे महामंडळाला दीड ते दोन लाख क्विंटलपर्यंत बियाणे मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परिणामी यंदा सोयाबीन बियाण्यांच्या टंचाईचा प्रश्‍नच येणार नाही.

यंदा उन्हाळी हंगामात विक्रमी सोयाबीनचा पेरा झाला आहे. यातच महाबीजने तब्बल १२ हजार हेक्टर क्षेत्रफळावर बियाण्यांचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे यंदा बियाणे टंचाई तर निर्माण होणार नाही. सध्या बियाणांची काय अवस्था आहे याची पाहणी कृषितज्ञ करीत असून बियाणांची उगवण आणि वाढ ही उत्तम आहे.

यंदा मुबलक प्रमाणात पाणी आणि पोषक वातावरणामुळे उन्हाळी हंगामातील सोयाबीन हे बहरात आहे. खरिपातील सोयाबीन प्रमाणे या उन्हाळी सोयाबीनची वाढ होत आहे. शेतकर्‍यांनी प्रथमच पीक पध्दतीमध्ये बदल करुन उन्हाळ्यात सोयाबीनचा पेरा केला आहे. राज्यात तब्बल १२ हजारावर उन्हाळी सोयाबीन घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे बियाणांचा तर प्रश्न मार्गी लागलाच आहे शिवाय शेतकर्‍यांना दर्जेदार बियाणे मिळणार आहे. महाबीजनेही यासाठी पुढाकार घेतला आहे. बियाणांबरोबर उन्हाळी हंगामातील सोयाबीनमधून शेतकर्‍यांच्या पदरी उत्पन्नही पडणार आहे.

हे पण वाचा :

Exit mobile version