सोयाबीनबाबत असे आहे शेतकऱ्यांचे म्हणणे

soyabean rate

हिंगोली : सोयाबीनच्या बाजार भावात वाढ झाल्याने शेतकरी समाधानी आहे. सोयाबीनला खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक मानले जाते. यंदा अवेळी झालेल्या पावसामुळे सोयाबीन आणि कापूस या पिकांचे उत्पादन घटले आहे. त्यातच कमी भाव मिळाल्याने मोठे नुकसान झाले होते. अशा वेळेस जर शेतकरी बांधवांच्या शेतमालाला चांगला भाव मिळाल्यास त्यांचे होणारे नुकसान हे भरून निघू शकते. सर्व सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकरी भाव कधी वाढणार याची वाट पाहत होते.

शेतकऱ्यांनी बाजारभावासाठी आवाज उठविल्याने, सोयाबीनला चांगला भाव आला आहे. या आठवड्यात पुन्हा एकदा सोयाबीन पिकांच्या बाजार भावात तेजी देताना दिसून येत आहे. सोयाबीनचे बाजार भाव वाढत असल्याने, बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक सुद्धा वाढली आहे. त्यामुळे बरेच शेतकरी सोयाबीनचे भाव वाढत असल्यामुळे त्यांचे सोयाबीन मार्केटमध्ये विकण्यास आनत आहेत. बळीराजाला शेवटी शेवटी सोयाबीन पिकास चांगला भाव मिळेल असे दिसून येत आहे.

मागील आठवड्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचे बाजार भाव पाच हजार रुपयांपासून साडेसहा हजार रुपयापर्यंत होते. परंतु आता हेच भाव ६००० ते ७००० हजार या पर्यंत पोहोचल्याची माहिती व्यापारी व बाजार समिती हिंगोली यांनी दिली आहे. चांगल्या प्रतीच्या मालाला भाव मिळत असल्याने आवक सुद्धा वाढलीय. आणखी यामध्ये ३०० ते ४०० रुपयांनी होण्याचा अंदाज बाजार समितीने व्यक्त केला आहे. मध्यंतरी दर कमी झाल्यानंतर आता दरांनी पुन्हा एकदा झेप घेतल्याचं दिसून येतं. जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनचं उत्पादन घेतलं जातं. सध्या प्रत्येक बाजार समित्यांमध्ये मोठी आवक सुरू असून, चांगल्या दर्जाच्या मालाला चांगला दर मिळताना दिसतोय.

हे देखील वाचा :

Exit mobile version