• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

कापसाची उगवण शक्ती आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी तज्ञांचा आहे हा सल्ला; वाचा सविस्तर

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in पीक लागवड
August 5, 2022 | 10:52 am
cotton tree

Cotton Plantation Tips : प्रत्येक वर्षी हवामानाच्या लहरीपणामुळे कापसावर विविध कीडरोगांचा प्रादुर्भाव होत असतो. यामुळे उत्पादनात कमतरता येवून शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत असते. एका अहवालानुसार, कपाशीवर भारतात १६२ प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो. महाराष्ट्रात २५ प्रकारच्या कीड आढळून येतात. त्यांपैकी १० ते १२ कीडीच जास्त नुकसान करतात. कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे शेतकर्‍यांकडे असलेल्या शास्त्रशुध्द माहितीचा अभाव. यामुळे नुकसान टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी काही उपाययोजना करणे आवश्यक असते.

कपाशीवर करपा, मर, कवडी, दहिया या रोगांसह पानावरील ठिपके, खोड व मूळकूज यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट येते. या रोगांचे नियंत्रण वेळची करणे आवश्यक असते. याबाबत तज्ञांनी शेतकर्‍यांना काय सल्ला दिला आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत. जिराईत कपाशीपेक्षा बागायती कपाशीचे रोगापासून जास्त नुकसान होते. कारण बागायती कपाशीमध्ये ओलाव्याचे प्रमाण जास्त असते. अशा वातावरणात रोगांचा प्रादुर्भाव आणि फैलाव झपाट्याने होतो. कपाशीवर बुरशी, जिवाणू, विषाणूमुळे रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतात. काहीवेळा आकस्मिक मर, मूलद्रव्यांच्या कमतरता दिसून येतात. रोगांमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्याकरिता योग्य वेळेत उपाययोजना करणे आवश्यक आहे. यात सनशाईन अ‍ॅग्रो प्रा.लिच्या (Sunshine Agri Private Limited) शास्त्रज्ञांनी कापूस उत्पादक शेतकर्‍यांना कुसीन गोल्ड व ए टू झेड बायो फर्टिलायझर (A to Z Bio Fertilizer) वापरण्याचा सल्ला दिला आहे. या दोन्ही उत्पादनांचे कापसाला कसे फायदे होतात, हे आज आपण जाणून घेवूयात…

कुसीन गोल्ड
कुसीन गोल्ड हे सेंद्रिय नायट्रोजन व मिनरल्सचे स्त्रोत आहे. व चिलेटींग गुणधर्मामुळे अन्नद्रव्याचे शोषण व वनस्पतींमध्ये परिवहन क्रिया सुलभ होते.
कुसीन गोल्ड च्या वापरामुळे वनस्पतींची श्‍वसन क्रिया सुरळीत होऊन हरितद्रव्य निर्मितीस चालना मिळून पिकाची वाढ जोरदार होते.
कुसीन गोल्ड मुळे उगवणशक्ती वाढते. आणि वनस्पतींच्या पेशींची जडण-घडण व्यवस्थित करते.
कुसीन गोल्ड च्या वापरामुळे पिकाच्या उत्पादनात वाढ होते.
कुसीन गोल्ड च्या वापरामुळे वनस्पतीतील अन्नद्रव्ये तसेच पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवते तसेच पिक हवामान व कमी पाणी यांचा ताण सहन करते.
कुसीन गोल्ड मुळे फुल व फळ गळतीस खिळ बसते. व पिकांच्या वाढीस आवश्यक हार्मोन्सची निर्मिती होऊन पिकाची वाढ होते.
वापरण्याचे प्रमाण : कुसीन गोल्ड : १ ग्रॅम कुसीन गोल्ड प्रति लिटर पाण्यात

ए टू झेड बायो फर्टिलायझर (A to Z Bio Fertilizer)
ए टू झेडच्या वापरा मुळे जमीनीतील सेंद्रीय प्रमाणात बदल होऊन जरुरी अन्नद्रव्य शोषण ग्रहण करण्याची क्षमता वाढते.
ए टू झेडच्या वापरा मुळे फायदेशीर सुक्ष्म जिवाणूंची संख्या वाढते.
ए टू झेड मुळे पेशींचे विभाजन व पेशींची निर्मिती जलद होते. त्यामुळे झाडांची वाढ सशक्त होऊन प्रतिकुल परिस्थितीला उदा. अति थंडी, अति उन्हाळा, अति पाऊस या पासून संरक्षण होते.
ए टू झेड फळ व फुलगळ कमी करते व उत्पादन आणि गुणवत्ता कर मध्ये सुधार करते.
ए टू झेडच्या वापरामुळे पिकाची रोग प्रतिकारक शक्ती मध्ये वाढ होते. त्यामुळे कीटाणुचे आक्रमण तसेच विपरीत वातावरणात सुद्धा संरक्षण करते.
ए टू झेड मध्ये बॉटनीकल न्युट्रीयंटस् असल्यामुळे पांढर्‍या मुळांची सशक्त व जोमदार वाढ होते.
ए टू झेड आंतर प्रवाही असल्यामुळे पिकाच्या संपुर्ण पेशींमध्ये त्वरीत पसरते व पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी लागणार्‍या आवश्यक घटकांचा पुरवठा करते व प्रकाश संश्लेषणाची क्रीयेत सुधार होते. व पिक हिरवेगार होते.
ए टू झेडच्या वापरामुळे जमिन भुसभुशीत होते. त्याचप्रमाणे त्यातील सेंद्रीय घटकांमुळे जमिनीचा सामु नियंत्रित होण्यास मदत होते तसेच पर्यायाने पांढर्‍या मुळयांची निर्मिती जास्त होऊन पाणी, जमीन व अन्नघटकांची कार्यक्षमता वाढते.

वापरण्याचे प्रमाण
दाणेदार : लागवडीच्या वेळेस २५ किलो व ४५ दिवसांनी २५ किलो एकरी द्यावे.
द्रवरुप : लागवडीनंतर ३० दिवसांनी, ४५ दिवसांनी प्रती पंप ३० मि.ली. या प्रमाणे फवारावे (२०० लिटर डणड पाण्यासाठी ४०० मि.ली.)
अधिक माहितीसाठी संपर्क : ९४०५०१९९८८

Tags: A to Z Bio FertilizerSunshine Agri
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
shetshivar 1

कृषी क्षेत्रात आर्टिफिशयल इंटेलिजेन्स (AI) च्या वापरामुळे घडणार कृषी क्रांती; जाणून घ्या सविस्तर

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट