• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

यंदा पाऊस समाधानकारक तरीही कृषीमंत्र्यांचा शेतकर्‍यांसाठी महत्वाचा सल्ला

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in बातम्या
May 20, 2022 | 5:31 pm
india-farmer

फोटो प्रतीकात्मक

मुंबई : ५ जून रोजी तळकोकणात पावसाचे आगमन झाल्यानंतर दोन ते तीन दिवसात मान्सूनचा पाऊस राज्यात सर्वदूर पसरेल, असे भाकित भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ वैज्ञानिक कृष्णानंत होसाळीकर यांनी वर्तविले आहे. यंदा ९९ टक्के पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला असला तरी पुरेसा पाऊस होण्याआधी पेरणीची घाई करु नका, असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.

मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. यामुळे पेरणीपुर्व तयारीला वेग आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा समाधानकारक पाऊस होणार आहे. यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पावसाच्या वर्दीमुळेच भारावरलेल्या शेतकर्‍यांनी पेरणीची तयारी देखील सुरु केली आहे. मात्र पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नका, असे आवाहन कृषीमंत्र्यांनी केले आहे.

दरवर्षी सर्वसाधारणपणे ७ जूनला महाराष्ट्रात येणारा मान्सूनचा पाऊस यंदा ५ जूनला राज्यात दाखल होणार आहे. त्याआधी पूर्वमोसमी पावसाने कोकणासह मराठवाड्यासह पश्‍चिम महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्रात जोरदार सलामी दिली आहे. मात्र या पावासामुळे अखेरच्या टप्प्यातील आंब्यासह भुईमुगाचे नुकसान होणाची शक्यता आहे.

पहिल्या पावासानंतर शेतकरी पेरणीची घाई करतात. मात्र यामुळे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. गत चार-पाच वर्षांचा अनुभव लक्षात घेता पावसात खंड पडल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवते. यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता असते. यामुळे यंदा पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरण्या न करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

उत्पदनात वाढ आणि दुबार पेरणीचे संकट टाळायचे असेल तर शेतकर्‍यांनी पुरेसा म्हणजेच १०० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्यावरच चाढ्यावर मूठ ठेवण्याचा सल्ला दिला आहे. राज्याची खरीप हंगामपूर्व बैठक झाल्यानंतर त्यांनी हे विधान केले आहे. शिवाय राज्यात सोयाबीन आणि कापसाचेच क्षेत्र यंदा वाढणार हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी पोषक वातावरणाचा फायदा घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
urea-fertilizer

शेतकर्‍यांनो बियाणे व खत खरेदी करताना अशी घ्या काळजी, वाचा काय आहे कृषी विभागाचे आवाहन

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट