• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

दुष्काळग्रस्त गाव झाले जलसमृद्ध… वाचा 300 उंबऱ्यांच्या गावाची प्रेरणादाई स्टोरी

मनीषा येरखेडेbyमनीषा येरखेडे
in यशोगाथा
April 14, 2022 | 5:16 pm
story of a drought stricken village

जालना : जालना जिल्ह्यात सुमारे तीनशे उंबऱ्यांचे गाव म्हणून भराडखेडा (ता. बदनापूर) ची ओळख आहे. सन २०१२ ते २०२६ या काळात गावाने दुष्काळाचे प्रचंड चटके सोसले. शिवारातून वाहणाऱ्या भोरडी नदीला पाणीच येत नसल्याने, टॅंकरने पिण्यासाठी पाणीपुरवठा करावा लागत होता. पाण्याअभावी शेतकऱ्यांना शिवारातील मोसंबी, डाळिंब बागांवर कुऱ्हाड चालवावी लागल्याची अनेक उदाहरणे आहेत.

अशा स्थितीत गावातील प्रगतिशील शेतकरी तसेच जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य व ‘नाम फाउंडेशन’ चे जिल्हा समन्वयक भाऊसाहेब घुगे यांनी पुढाकार घेत, फाउंडेशनला पाण्याअभावी आपल्या गावाची होत असलेली बीकट परिस्थिती विशद केली. मग चर्चा घडल्या. अपापसांतील मतभेद बाजूला ठेवून गावकरी एक झाले. भोरडी नदी रुंदी- खोलीकरणासाठी हालचाली सुरू झाल्या आणि संपूर्ण गाव शिवार जलसमृद्ध झाले.

आणि सुरू झाली पाणीटंचाई मुक्ती
भोरडी नदी पुनरुज्जीवनात भगवानराव बारगाजे यांच्या समन्वयातून आनंदनगरी व सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळाचे सहकार्य मिळाले. त्यातून सात किलोमीटर नदीचे रुंदी- खोलीकरण, बांधबंदिस्ती काम पूर्णत्वास गेले. गावकऱ्यांच्या कष्टाला फळ आले आणि झालेल्या पावसाने नदी दुथडी भरून वाहू लागली. हात पाणी साठून आसपासच्या जलस्रोतांचा स्तर वाढण्यास मदत झाली. बांधबंदिस्ती यातूनही पाणी उपलब्धता वाढण्यास मदत झाली. कृषी विभागाच्या योजनेच्या माध्यमातून तयार झालेल्या लहान- मोठ्या ४५ शेततळ्यांनीही हातभार लावला. त्यातून पिकांना संरक्षित पाणी देण्याची सुविधा तयार झाली. पाणी उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱयांनी त्याचे योग्य नियोजन करीत, पाणी साठवणूक करण्यास सुरूवात केली. आज, गावातील एकूण ७०२ हेक्‍टरपैकी ४१० हेक्‍टर क्षेत्र ठिबकखाली आले आहे.

पीकपद्धतीतरही केला बदल
सुमारे ७०२ हेक्‍टरचा शिवार असलेल्या भराडखेडा गावातील शेतकरी पारंपरिक खरीप व रब्बी पिके घेत होतो. परंतु, शेतकऱयांनी विचारविनीयम करून, त्यात बदल करीत, पीकपद्धतीत बदल केला. शिवारात आता २२० हेक्‍टरवर फळबागा असून त्यात ३० हेक्‍टर डाळिंब, १०० हेक्‍टर मोसंबी, ४० हेक्‍टर आंबा तर कांदा, टोमॅटो, कारली मिरची आदी बीजोत्पादनाचे सुमारे ५० एकर क्षेत्र आहे. बालाजी व प्रकाश हे शिंदे बंधू २०१० पासून संरक्षित शेतीची कास धरत थेट कंपन्यांशी करार करीत शेडनेटमध्ये टोमॅटो, कारली, मिरचीचे बीजोत्पादन घेतले.  प्रगतिशील शेतकरी भानुदास घुगे यांनी ब्राझीलच्या सीडलेस मोसंबी वाणाचा पाच एकरांत नावीन्यपूर्ण प्रयोग केला आहे. गुजरातमधील कच्छवरून आणलेल्या खजुराची ३२५ रोपे लावली.  केसर व गावरान आंबाही गावातील शिवारात निघत आहे. प्रत्येकी सव्वादोन एकरांची दोन शेततळी आहेत. काही अंतरावरील राजेवाडी तलावावरून पाइपलाइनने पाणी आणले आहे.  

शेतकरी कंपनीची स्थापना
भराडखेडा व बदनापूर तालुक्‍यातील गावातील शेतकऱ्यांना एकत्र करत रामदास बारगाजे यांच्या पुढाकारातून २०१९ मध्ये ‘ॲग्रोबोर्ड फार्मर प्रोड्यूसर कंपनी’ची स्थापना केली आहे. सुमारे ३०० सभासद असून सौ. सुशीला रामदास बारगाजे अध्यक्षा आहेत. ७५ टक्‍के सभासद मोसंबी उत्पादक आहेत. साहजिकच क्लिनिंग, ग्रेडिंग व वॅक्सिंग युनिट उभारणीसाठी कंपनीचे प्रयत्न आहेत. परिसरात वाढलेले सीताफळ, पेरू, जांभळाचे क्षेत्र पाहता  प्रक्रिया युनिटची उभारणी करण्याचा मानस आहे. गावातच नाथ ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी देखील भाऊसाहेब घुगे यांच्या नेतृत्वात मागील वर्षी स्थापन करण्यात आली आहे.

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
indian currency

'या' झाडाच्या शेतीतून पाच वर्षात व्हा करोडपती, जाणून घ्या सविस्तर

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट