• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result

लिंबाचे दर विक्रमी पातळीवर तरीही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच; जाणून घ्या काय आहे कारण

मनीषा येरखेडे by मनीषा येरखेडे
April 26, 2022 | 3:50 pm
in बातम्या
Lemon

पुणे : देशातील प्रमुख बाजारेपठांमध्ये लिंबाचा भाव २०० रुपये किलोवर पोहोचला आहे. म्हणजे जवळपास आठ रुपयांना एक लिंबू विकले जात आहे. त्यामुळे लिंबू उत्पादक शेतकरी मालामाल झाले असतील असे कोणालाही वाटू शकते. पण तसे अजिबात नाही. लिंबाचे दर भडकलेत खरे पण शेतकरी मात्र तोट्यातच असल्याचे वास्तव चित्र आहे. कारण यंदा उत्पादनात निम्म्याहून जास्त घट झाली आहे. मजुरीचा खर्च वाढल्याने उत्पादन खर्चही वाढला आहे. त्यामुळेच गेल्या वर्षीपेक्षा लिंबाचे दर दुप्पट होऊनही गेला हंगामच चांगला होता, अशी शेतकऱ्यांची भावना आहे.

यंदा उन्हाचा चटका वाढला तशी लिंबाला मागणीही वाढली. दरवर्षी उन्हाळ्याचा बाजार डोळ्यासमोर ठेऊन शेतकरी नियोजन करत असतात. उन्हाळ्यात लिंबाला बऱ्यापैकी दर मिळतो. त्यामुळे या काळात उत्पादन घेण्याऱ्या शेतकऱ्यांची संख्याही जास्त असते. वर्षभराचा विचार करता या चार महिन्यांत बाजारातली आवकही जास्त असते. यंदा मात्र चित्र उलट आहे. यंदा कडक उन्हाळा आणि रमजानचा महिना यामुळे लिंबाच्या मागणीत वाढ झाली. मात्र. उत्पादन कमी असल्याने, बाजारात लिंबाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लिंबाला विक्रमी दर मिळत आहे.

महाराष्ट्रासह गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यांत लिंबाचे दर वाढले आहेत. गुजरातमध्ये लिंबाला १८० ते २०० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. तर महाराष्ट्रात १२० ते २०० रुपयाने व्यवहार होत आहेत. शेतकऱयांकडे लिंबाची 300 ते ४०० झाडे असूनही, फळ लागण्याच्या काळात धुक्यामुळे फळे गळून पडली आहेत. त्यामुळे उत्पादन घटलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत मला केवळ ३० टक्केच उत्पादन मिळालं. सध्या २०० रुपयांपर्यंत दर आहे. मात्र उत्पादन कमी असल्यामुळे लावणीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे.

गेल्या वर्षी ११ एप्रिलपर्यंत ७५० कट्टे स्थानिक बाजारात दाखल झाले होते. मात्र यंदा केवळ १२० कट्टे हाती लागले आहेत. यंदा दर दुप्पट झाला. पण त्याचा काही उरयोग नसल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी एका शेतकऱयांकडून रोज ५० ते ६० कट्टे बाजारात जायचे. पण यंदा केवळ ५ ते १० टक्के उत्पादन झाल्याने, बाजारातील अवक कमी झाली आहे. त्यामुळे या दरवाढीचा काही फायदा नाही. उलट गेल्या वर्षी लींबाचा हंगाम यापेक्षा बरा असल्याचे बोलेले जात आहे.

मनीषा येरखेडे

मनीषा येरखेडे

ताज्या बातम्या

90 of farmers repaid crop loans

लांबलेला पाऊस आणि पीक कर्जाचा संबंध कसा असतो हे तुम्हला माहित आहे का?

June 26, 2022 | 1:19 pm
weather-updates-rain

Weather Alert : राज्यात पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा इशारा; ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी

June 26, 2022 | 9:11 am
devnarayan pashupalan awasiya yojana

गाई, म्हशींसाठी वसवले अत्याधुनिक शहर; मॉल, शाळा, रुग्णालयासह अनेक सुविधा

June 26, 2022 | 8:53 am
shen

शेणाची वर्षभरासाठी होतेय बुकिंग; ‘या’ कारणामुळे अचानक वाढले शेणाचे महत्व

June 25, 2022 | 10:36 am
kapus-cotton-market-rate

कापूस लागवडीआधी शेतकर्‍यांना सतावतेय ही चिंता; वाचा सविस्तर

June 25, 2022 | 8:30 am
cow

शेतकऱ्यांनो तुमचे पशुधन आजारी तर पडले नाही ना? असे तपासा

June 24, 2022 | 4:18 pm
  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group