• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

रब्बी कांदा लागवड करतांना असे करा नियोजन, होईल बंपर उत्पादन

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in पीक व्यवस्थापन
September 24, 2022 | 1:53 pm
onion-kanda

नाशिक : कांदा हे रब्बी हंगामात घेतले जाणारे पीक आहे. कांद्याच्या रोपांना थंड हवा मानवते. अधिक तापमान व आर्द्रता पिकास हानिकारक आहेत. रब्बी कांद्यासाठी बियांची पेरणी ऑक्टोबरमध्ये करून रोपांची पुर्नलागवड डिसेंबर-जानेवारीमध्ये करतात आणि एप्रिल ते मेमध्ये पीक काढणीस तयार होते. मात्र रब्बी कांदा लागवड करतांना योग्य नियोजन करणे आवश्यक असते. अन्यथा शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होवू शकते. आज आपण रब्बी कांदा लागवडीसाठी आवश्यक असलेले तंत्रशुध्द नियोजन कसे कराव? याची माहिती जाणून घेणार आहोत.

शेतातील पूर्वीचे पीक काढल्यानंतर शेत नांगरुन घ्यावे. मशागत करत असताना हे. ४० ते ५० बैलगाड्या शेणखत किंवा कंपोस्ट जमिनीत मिसळून द्यावे. पुर्नलागवडीसाठी शेताची आखणी सपाट वाफे अगर सरी वरंबा पद्धतीने करावी. मोठ्या आकाराचा कांदा हवा असल्यास अगर जमीन भारी असल्यास सरी वरंबा पद्धत चांगली आहे. रांगड्यासाठी व हिवाळ्यातील लागवडीसाठी सपाट वाफे पद्धत चांगली आहे. वाफ्याची रुंदी २ मीटर व लांबी जमिनीच्या उतारानुसार ठेवावी. दोन सरीतील अंतर ३० ते ४५ सें. मी. ठेवून सर्‍या पाडाव्यात. एक हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवडीसाठी ९ ते १० किलो बियाणे लागते व त्यासाठी १० ते १२ गुंठे रोपवाटिकेसाठी लागते. कांद्याची रोपे गादीवाफ्यावर तयार करावीत. गादी वाफा १ ते १.५ मी. रुंद २ मी. लांब व १५ सें. मी. उंच करावा. वाफे तयार करताना प्रत्येक वाफ्यात २ घमेले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट, २५० ग्रॅम सुफला (१५:१५:१५) व २० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्‍लोराईडकची पावडर मिसळावी.

खत व पाणी व्यवस्थापन
कांदा पिकास प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ८० किलो पालाश याप्रमाणे खते द्यावीत. यापैकी ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी आणि उरलेले ५० टक्के नत्र दोन समान हप्त्यात लागवडीनंतर ३० ते ३५ आणि ४० ते ४५ दिवसांनी द्यावे, तसेच ५० किलो गंधक लागवडीच्या वेळी द्यावे. कांद्याच्या दर्जेदार उत्पादनासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज असते. यासाठी माइक्रोला या सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्‍त द्रवरुप खताच्या दोन फवारण्या द्याव्यात. पहिली फवारणी ३० दिवसांनी व दुसरी ६० दिवसांनी करावी. प्रमाण प्रति एकरी ५०० मि. लि. माइक्रोला + २०० लिटर पाणी + १०० मि. लि. स्टिकर. रब्बी हंगामात कांदा पिकास जमिनीच्या मगदुरानुसार १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पाने पिवळी पडू लागल्यावर कांदा काढणीपूर्वी २० दिवस अगोदर पाणी देणे बंद करावे. स्प्रिंकलर व ठिबकने पाणी दिल्यास पाण्याची बचत होऊन अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते.

रोग व कीड नियंत्रण
कांदा पिकावर प्रामुख्याने मर व करपा हे रोग आणि फुलकिडे या किडीचा प्रादुर्भाव होतो. मर रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी २ ते ३ ग्रॅम थायरम किंवा बावीस्टीन प्रति किलो बियाण्यास चोळावे. तसेच नर्सरीमध्ये रोगाच्या नियंत्रणासाठी वाफ्यामध्ये प्रति चौरस मीटरला ५ ग्रॅम थारयम किंवा बावीस्टीन मिसळावे. तसेच ट्रायकोडर्मा व्हिरीडी हे जैविक बुरशीनाशक १०० ग्रॅम ५ किलो कुजलेल्या शेणखतात मिसळून रोपवाटिकेच्या १०० चौ. मी. क्षेत्रात मिसळावे. वाफ्यात पाणी साचून देऊ नये. फुलकिडे व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी पुनर्लागवडीनंतर २ ते ३ आठवड्यांनी ७५० मि. लि. फिप्रोनिल (५ एस. सी.) किंवा ५०० मि. लि. प्रोफेनोफॉस (५० ईसी) किंवा ५०० मि. लि. कार्बोसल्फान (२५ ई. सी.) अधिक कॉपर ऑक्सीक्‍लोराईड १२५० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब (डायथेन एम-४५) १००० ग्रॅम ५०० लिटर पाण्यात स्टिकर मिसळून प्रति हे?टरी १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
lasun garlic 1

रब्बी हंगामात अशी करा लसणाची लागवड, होईल मोठा आर्थिक फायदा

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट