• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

कृषी विभागाच्या नाकावर टिच्चून खतांची लिंकिंग; शेतकर्‍यांची लूट सुरुच

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in बातम्या
May 23, 2022 | 5:30 pm
Fertilizers

जळगाव : राज्य सरकार व कृषी विभाग खरिप हंगामात शेतकर्‍यांना विविध आश्‍वासने देत सर्व काही ऑल ईज वेल असल्याचा देखावा करत असला तरी स्थानिक पातळीवर परिस्थिती पार वेगळीच आहे. कापसाच्या बियाण्यांची विक्री १ जून नंतरच सुरु होईल, अशी कृषी विगाची आग्रही भुमिका असली तरी काही ठिकाणी शेतकर्‍यांनी आडमार्गाने कापसाचे बियाणे मिळवून पेरण्यांना सुरुवात केली आहे. दुसरीकडे रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करुन चढ्या दराने विक्री केली जात आहे. शिवाय लिंकिंगही कायम आहे.

खरीप हंगामात डीएपी खताला मोठी मागणी असते. शेतकर्‍यांच्या या मागणीचाच गैरफायदा हे विक्रते घेत आहेत. या खताची मूळ किंमत यंदा १ हजार ३५० एवढी आहे तर सध्या बाजारपेठेत १ हजार ४५० ने विक्री सुरु आहे. एका पोत्यामागे १०० रुपये अधिकचे आकारले जात आहेत. शेतकर्‍यांनी डीएपी खत विकत घेतले की त्याला लागूनच इतर खतही खरेदी करावे लागते. इतर कंपनीचे खत विक्री व्हावे म्हणून असा फंडा विक्रेते काढत आहेत पण लिंकिंगने खताची खरेदी करावी असे बंधन नाही.

खरिपपूर्व आढावा बैठकीत कृषी विभागाने शेतकर्‍यांना मोठ मोठी आश्‍वासने दिली असली तरी त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाहीये. शेतकर्‍यांची आर्थिक लूट टाळणसाठी कृषी विभागाने पथकांची नेमणूक केली मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने विक्रेत्यांची मनमानी वाढत आहे. शेतकर्‍यांची गरज लक्षात घेऊन विक्रेते अधिकचा दर तर आकरतातच पण कृत्रिम टंचाई निर्माण करुन शेतकर्‍यांना अडचणीतही आणत आहेत.

यंदा बिजोत्पादनाचा प्रयोग मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याने बियाणांची टंचाई निर्माण होणार नाही अशी स्थिती होती. मात्र, अधिकच्या तापमनामुळे सोयाबीनच्या दर्जावर परिणाम झाला होता. त्यामुळे हे बियाणे आता वापरण्यायोग्य राहणार नाही. ही परिस्थिती पाहता महाबीजने देखील आडमुठी भुमिका घेत २ हजार रुपयांची वाढ म्हणजेच २ हजार २०० रुपयांना असणारी सोयाबीनची ३० किलोची बॅग ही आता ४ हजार २०० रुपयांना मिळणार आहे.

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
uddhav-thackeray

शेतकऱ्यांचा ठाकरे सरकारला सात दिवसांचा अल्टिमेटम; या आहेत ११ मागण्या

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट