• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी : खरिपाच्या पेरणीचे निकष बदलले

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in बातम्या
June 10, 2022 | 3:31 pm
farmer kharif

पुणे : महाराष्ट्रात मान्सून अद्यापही दाखल झालेला नाही. गत आठवडाभरात काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असली तरी हा पाऊस मान्सूनपूर्व आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे. याच दरम्यान सर्वात मोठी माहिती म्हणजे, १०० मिमी पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करुन नये असा सल्ला कृषि विभागाने दिला होता. पण योग्य प्रमाणात जमिनीत ओल आणि ७५ मिमी पाऊस झाला तरी चाढ्यावर मूठ ठेवण्यास हरकत नसल्याचे मत कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी व्यक्त केले आहे. याकडे शेतकर्‍यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

यंदा वेळेपूर्वी मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. यामुळे शेतकर्‍यांनी पेरणीपूर्व कामे गतीने पूर्ण केली मात्र १० जून उजाडल्यानंतरही मान्सूनचे आगमन झालेच नाही. हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार येणार्‍या २४ तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल व त्यानंतर पुढील सात ते आठ दिवसात त्याची व्याप्ती वाढेल. या सर्व गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर पेरण्यांबाबत शेतकर्‍यांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. आधीच दोन वर्षांपासून या-ना त्या कारणांमुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे यंदाच्या खरिप हंगामात योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे.

१०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरण्या न करण्याचे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले होते. कारण शेतकर्‍यांनी जमिनीत ओलावा नसताना पेरणीची घाई केल्यास जमिनीतील उष्णतेमुळे पेरलेल्या बियाण्यांचे अंकुरण होणार नाही व शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावेल. खरीप हंगामातील सर्व पिके जमिनीत पुरेशी ओल चार ते सहा इंच खोल जमीन ओली झाल्याची खात्री करूनच पेरणी केली तरच फायद्याचे राहणार आहे.

कृषि विद्यापीठाच्या नव्या आवाहनानुसार, ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस पडून जमिनीतील ओल चार ते सहा इंच खोल जाणे आवश्यक आहे. शेतकर्यांनी पेरणी करण्यापूर्वी पुरेसा पाऊस पडल्यानंतर जमीनीत पुरेशी ओल निर्माण झाल्याची खात्री करूनच पेरणी करावी. अन्यथा आगोदरच उशिर आणि त्यात पुन्हा पावसाने ओढ दिली तर दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते.

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
banana damage

ऐन काढणीला आलेल्या केळी बागा आडव्या; या भागात झाले सर्वाधिक नुकसान

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट