पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी सेंद्रीय शेतीवर (Narendra Modi on Organic Farming) जास्त भर देत आहेत. शेतकर्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी शेतीबद्दल ने अनेकवेळा शेतकऱ्यांशी संवाद साधत असतात. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या ६७ व्या आवृत्तीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेमन ग्रासच्या लागवडीचा (Narendra Modi on Lemon Grass Farming) उल्लेख केला होता. याचा संदर्भ देत ते म्हणाले होते की, या शेतीमुळे शेतकरी बांधव स्वत:ला सक्षम बनवत आहेत आणि देशाच्या प्रगतीतही हातभार लावत आहेत. लेमन ग्रास शेती काय असते, त्यातून शेतकऱ्यांना कसा फायदा होतो, कशामुळे पंतप्रधानांनी लेमनग्रास शेतीचा उल्लेख केला, याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेवूयात….
काही शेतकर्यांनी लेमन ग्रास शेतीचा यशस्वी प्रयोग राबवत त्यातून लाखों रुपयांचे उत्पन्न घेतले आहे, यामुळेच लेमन ग्रास शेतीची दखल खुद्द देशाच्या पंतप्रधानांना घ्यावी लागली. एक हेक्टर शेतीमधून सरासरी चार लाखांचे उत्पन्न यात मिळविता येणे शक्य आहे. लेमन ग्रास लागवडीची वेळ फेब्रुवारी ते जुलै आहे.
गांडूळ खत निर्मितीसाठी महत्त्वाच्या टिप्स
‘या’ सेंद्रिय खतांचा रब्बी पिकांसाठी वापर करा, ज्यामुळे होईल बंपर उत्पादन
नॅनो युरियामुळे शेतकर्यांना होतोय मोठा फायदा; वाचा काय म्हणतोय केंद्र सरकारचा अहवाल
‘भारत’ ब्रँड अंतर्गत ‘वन नेशन वन फर्टिलायझर’; वाचा सविस्तर
युरियाची गरज संपणार? इंदोरच्या शेतकर्याने शेतात घेतले नायट्रोजनचे उत्पादन
सेंद्रीय शेती : भारतातून कुवेतमध्ये जाणार १९२ मेट्रिक टन शेण
वर्षातून तीन ते चार वेळा कापणी केली जाते. यातून निघणार्या तेलाचा दर १ हजार ते १५०० रुपये किलोपर्यंत आहे. लागवडीनंतर चार महिन्यांनी पहिली काढणी केली जाते. लिंबू ग्रास तयार आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी, ते तोडल्यानंतर आणि त्याचा वास घेतल्यास, तुमचे पीक तयार आहे. एका वर्षात अर्धा गुंठा जमिनीतून सुमारे ३ ते ५ लिटर तेल निघते. जमिनीपासून ५ ते ८ इंच वर कापणी करावी. दुसर्या कापणीत १.५ लीटर ते २ लीटर तेल निघते. उत्पादन क्षमता तीन वर्षांपर्यंत वाढते. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते प्राणी खात नाहीत आणि किडही लागत नाही.
यामुळे या पीकाला औषध फवारणीचा खर्चही नसतो. या लागवडीसाठी खताचीही गरज भासत नाही. एकदा पीक पेरले की ते ५-६ वर्षे टिकते. लेमन ग्रासपासून काढलेले तेल सौंदर्यप्रसाधने, साबण, तेल आणि औषधे बनवणार्या कंपन्या वापरतात.