• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

धक्कादायक : ‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’च्या संकल्पानंतर २४ दिवसांत ८९ शेतकर्‍यांच्या आत्महत्या

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in बातम्या
July 26, 2022 | 12:02 pm
farmer succied

मुंबई : नवनिर्वार्चित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी दिनानिमित्ताने १ जुलैला ‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’चा पहिला संकल्प जाहीर केला. मात्र मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही अवघ्या २४ दिवसांत राज्यात तब्बल ८९ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यात औरंगाबाद, बीड, यवतमाळ जिल्ह्यांत सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. अतिवृष्टी, पूर अशी परस्थिती ओढावली असताना अनेक जिल्ह्यांमध्ये पंचनाम्यांना सुरवात झालेली नाही. जेथे पंचनामे सुरु झाले आहेत तेथे त्यांचा वेग अंत्यत संथ आहे. सलग दोन वर्ष नुकसान झाल्यानंतर किमान यंदा तरी पदरात काहीतरी पडेल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना होती. मात्र अतिपावसामुळे संपूर्ण खरिप हंगाम देखील हातून गेला आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा यातून नैराश्य आल्याने शेतकरी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.

जिल्हानिहाय आत्महत्या
निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा मराठवाड्यातील शेतकर्‍यांना बसलेला आहे. शिवाय सरकारच्या घोषणा हवेतच विरलेल्या आहेत. त्यामुळे कर्जाचा डोंगर आणि नापिकी यामुळे गेल्या २४ दिवसांच्या काळात मराठवाडा विभागात ५४ शेतकर्‍यांनी आपले जीवन संपवले आहे. औरंगाबाद १५, बीड १३, यवतमाळ १२, अहमदनगर ७, परभणी ६, जळगाव ६, जालना ५, बुलडाणा ५, उस्मानाबाद ५, अमरावती ४, वाशिम ४, अकोला ३, नांदेड २, भंडारा-चंद्रपूरमध्ये २ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.

नियमित कर्ज अदा करणार्‍या शेतकर्‍यांना १ जुलैपासून प्रोत्साहनपर रक्कम मिळणार होती त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. शेतकर्‍यांसाठी केवळ घोषणांचा पाऊस होत असून बांधावरची स्थिती ही वेगळी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ जुलै रोजी कृषीदिनानिमित्ताने ‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’चा संकल्प करत राज्यातील शेतकरी संकटात येऊ नये म्हणून मोठे निर्णय घेत आहोत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या होऊ नये त्यासाठी देखील मार्ग काढला जात आहे. शेतकर्‍यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी सरकार कटीबध्द आहे, असे म्हटले होते. मात्र, गेल्या २४ दिवसांमध्ये राज्यातील ८९ शेतकर्‍यांनी आपले जीवन संपवले आहे.

संवंग घोषणांपलीकडे जावून ठोस निर्णय हवेत
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत महाराष्ट्र शासनाने बळीराजा चेतना अभियान, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन स्थापन केले होते. सध्या हे दोन्ही उपक्रम बासनात गुंडाळले आहेत. एकीकडे महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. बियाणे, खते, किटकनाशकांपासून मजूरीचे दर गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे त्या तुलनेत शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांवरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. या शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर संवंग घोषणांपलीकडे जावून ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

ratal

या पिकातून केवळ १३० दिवसात कमवा लाखों रुपयांचा नफा

August 13, 2022 | 3:58 pm
plan tree

सप्टेंबरमध्ये या पिकांची लागवड करा आणि भरघोस नफा मिळवा

August 13, 2022 | 3:12 pm
kanda-bajarbhav

तीन महिन्यांपासून कांद्याने शेतकर्‍यांना रडवले, नाफेडमुळे कांदा उत्पादक अडचणीत

August 13, 2022 | 2:22 pm
wheat

या एका निर्णयामुळे गव्हाच्या किंमती स्थिर झाल्या; वाचा सविस्तर

August 13, 2022 | 1:55 pm
udit dal tur dal

अति पावसामुळे तूर डाळ आणि उडीद डाळींच्या किंमतीवर होतोय असा परिणाम

August 11, 2022 | 4:07 pm
top 10 tractor

क्या बात है…जुलै महिन्यात ५९ हजार ५८६ ट्रॅक्टर विक्री

August 11, 2022 | 3:31 pm
Next Post
urea-fertilizer

पिकं संकटात पण युरिया मिळेना; वाचा काय आहे शेतशिवार आणि बाजारपेठेची स्थिती

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट