आर्थिक संकटाचा सामना करणार्या श्रीलंकेत आता अन्न संकट ही एक मोठी समस्या म्हणून समोर आली आहे. श्रीलंकेला उपासमारीचा सामना करावा लागत आहे. हे पाहता श्रीलंकेने सरकारी कर्मचार्यांना अन्नधान्याची वाढती टंचाई रोखण्यासाठी त्यांच्या घराजवळील पिके घेण्यासाठी दर आठवड्याला एक अतिरिक्त दिवस सुट्टी घेण्यास सांगितले आहे.
मंत्रिमंडळाने प्रसिध्द केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, सरकारी अधिकार्यांना आठवड्यातून एक अतिरिक्त दिवस देणे आणि त्यांना त्यांच्या घराजवळील कृषी कार्यात गुंतण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे योग्य आहे. नागरी सेवकांच्या हालचाली कमी केल्याने इंधनाचा वापर कमी होण्यास मदत होईल आणि अतिरिक्त दिवस सुट्टी भविष्यात अन्नाची कमतरता दूर करेल, असे निवेदनात म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात युनायटेड नेशन्सने दिलेल्या माहितीनुसार, २२ दशलक्ष लोकसंख्येच्या देशातील पाच पैकी चार लोक अन्न सोडत आहेत. युनायटेड नेशन्सचा अंदाज आहे की देशाच्या सुमारे एक तृतीयांश लोकसंख्येला अन्न मदतीची आवश्यकता आहे. त्यांना आवश्यक अन्नपदार्थ आणि पोषक तत्वांचा अभाव आहे. यामुळे कृषि उत्पादन वाढविण्यासाठी सरकार विविध मार्गांचा अवलंब करतांना दिसत आहे.